पोवाडा लेखन

स्वराज्य सूर्य तळपला!

पहिला छत्रपती!

कथा:- सह्याद्रीच्या खोऱ्यात,गरिब रयत जीव मुठीत धरून दिवस कंठीत होती,आदिलशाही ,कुतुबशाही,मोंगलांनी चहुबाजूनी जनतेला वेठीला धरलेले!परप्रांतात चाकरीला असणाऱ्या शहाजी राजांचे व जिजाऊचे रक्त आपल्या मायबहिणींवरच्या होणाऱ्या अत्याचाराने पेटून उठले होते!तशात जिजाबाई गरोदर होती,तीला बाळंतपणासाठी मावळप्रांती परत पाठवून तीच्याकरवी ,हिंदवी स्वराज्याची स्थापना करायचे स्वप्न त्या दोघांनी बघितले…..

पद्य:-सह्याद्रीच्या खोऱ्यात,

सारी जनता आली रंजीस,

चहुबाजूनी वेठीस धरी  रयतेला,

फेरा मोंगलांचा पडला जनतेला,

आयाबहिणींना लावले भिकेला!

पाहूनीअत्याचार घोर,

रक्त शहाजी ,जिजाईचे पेटले,

हिंदवी स्वराज्याचे,स्वप्न त्यांनी पाहिले!

स्वप्न त्यांनी पाहीले जी रं जी रं जी जी……..।।१।।

                     
                                                                                                                        Read more...
error: